Saturday, 29 July 2017

सत्कार्या साठी काम करावं सत्कारा साठी नाही

एक छान व हृदयस्पर्शी लेख .....

'' काही राहिलं तर नाही ना ''

             जीवनामध्ये तुम्ही खूप काही मिळवलं असलं तरी आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर पुढे जात असताना नेहमी हा प्रश्न सर्वांनाच पडतो...
“काही राहिलं तर नाही ना?”

        वर्षभराच्या पोराला बाईच्या हवाली टाकून जॉबसाठी जाण्याऱ्या आईला ती बाई जेव्हा विचारते
“पर्स, चावी घेतली ना, काही राहिलं तर नाही ना?”
       ती आई कशी सांगेल कि ज्याच्या भविष्यासाठी एवढा आटापिटा चालू आहे तोच तर राहिला !!!

           खूप आशेने आईबापाने पोराला शिकविले. पोरगा परदेशात सेटल झाला. नातू जन्मला म्हणून आजी आजोबा टूरिस्ट विसावर गेले. ३ महिने झाल्यावर निघताना पोरगा सहजच बोलून गेला
“सगळ चेक करून घ्या, काही राहिलं तर नाही ना?”
काय उत्तर द्यावे त्या म्हातार्यांना कळेना कारण “आता मागे राहायला शिल्लक तरी काय आहे”

           लग्न होऊन पोरगी वरातीसोबत निघून गेली तेव्हा बापाला आत्या विचारते
“दादा, पोरगी काही विसरली नाही ना रे, काही राहिलं तर नाही ना?”
भूतकाळात गेलेल्या त्या बापाला पोरीच्या रूम मध्ये सुकलेली फुले दिसतात. अश्रू लपवत लपवत बाप बोलला “ती गेली पण आठवणी इथेच राहिल्या, दुसरे काय राहणार”

            ६० वर्षे वय झाल्यावर आज साहेबाचा ऑफिसमध्ये शेवटचा दिवस होता. चपरासी बोलला 
“साहेब, काही राहिलं तर नाही ना?”
        साहेबानी डोळे बंद केले तर लक्षात आले कि पूर्ण आयुष्य या जागी काम करण्यात केले. सगळ्च इथे आहे मग “मागे काय राहणार”

         स्मशानात आईच्या चितेला अग्नी देऊन बाहेर पडलेल्या पोराला मित्र विचारतो
“मित्रा, काही राहिलं तर नाही ना?”
तो धावत धावत परत अग्नीजवळ गेला. आईचा चेहरा पाहण्यासाठी केलेला प्रयत्न अयशस्वी झाला.
      त्याला उमजेना कि काय राहून गेले. डोळे पुसत पुसत तो म्हणाला “काही नाही रे, जे राहिले ते आता सदा स्मरणात राहील”

           एकदा तरी वेळ काढून मागे बघा. जुन्या आठवणी ताज्या करा. डोळे भरून येईल. मन प्रफुल्लित होईल
आणि........
      आत्ताचा हा क्षण जगण्याची नवी उमेद मिळेल. मग कधीही काहीच मागे राहणार नाही.....
☝#हरायचं तर आहेच #एक दिवस #'मृत्यु'कडून...*

 *तोपर्यंत #आयुष्याला #'जिंकून' घ्या...
  
*सत्कार्यासाठी काम करावं...सत्कारासाठी नाही..!!!*
*इतरांसाठी मनापासून झिजावं...दिखाव्यासाठी नाही..!!!*

सत्कार्या साठी काम करावं सत्कारा साठी नाही

एक छान व हृदयस्पर्शी लेख .....

'' काही राहिलं तर नाही ना ''

             जीवनामध्ये तुम्ही खूप काही मिळवलं असलं तरी आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर पुढे जात असताना नेहमी हा प्रश्न सर्वांनाच पडतो...
“काही राहिलं तर नाही ना?”

        वर्षभराच्या पोराला बाईच्या हवाली टाकून जॉबसाठी जाण्याऱ्या आईला ती बाई जेव्हा विचारते
“पर्स, चावी घेतली ना, काही राहिलं तर नाही ना?”
       ती आई कशी सांगेल कि ज्याच्या भविष्यासाठी एवढा आटापिटा चालू आहे तोच तर राहिला !!!

           खूप आशेने आईबापाने पोराला शिकविले. पोरगा परदेशात सेटल झाला. नातू जन्मला म्हणून आजी आजोबा टूरिस्ट विसावर गेले. ३ महिने झाल्यावर निघताना पोरगा सहजच बोलून गेला
“सगळ चेक करून घ्या, काही राहिलं तर नाही ना?”
काय उत्तर द्यावे त्या म्हातार्यांना कळेना कारण “आता मागे राहायला शिल्लक तरी काय आहे”

           लग्न होऊन पोरगी वरातीसोबत निघून गेली तेव्हा बापाला आत्या विचारते
“दादा, पोरगी काही विसरली नाही ना रे, काही राहिलं तर नाही ना?”
भूतकाळात गेलेल्या त्या बापाला पोरीच्या रूम मध्ये सुकलेली फुले दिसतात. अश्रू लपवत लपवत बाप बोलला “ती गेली पण आठवणी इथेच राहिल्या, दुसरे काय राहणार”

            ६० वर्षे वय झाल्यावर आज साहेबाचा ऑफिसमध्ये शेवटचा दिवस होता. चपरासी बोलला 
“साहेब, काही राहिलं तर नाही ना?”
        साहेबानी डोळे बंद केले तर लक्षात आले कि पूर्ण आयुष्य या जागी काम करण्यात केले. सगळ्च इथे आहे मग “मागे काय राहणार”

         स्मशानात आईच्या चितेला अग्नी देऊन बाहेर पडलेल्या पोराला मित्र विचारतो
“मित्रा, काही राहिलं तर नाही ना?”
तो धावत धावत परत अग्नीजवळ गेला. आईचा चेहरा पाहण्यासाठी केलेला प्रयत्न अयशस्वी झाला.
      त्याला उमजेना कि काय राहून गेले. डोळे पुसत पुसत तो म्हणाला “काही नाही रे, जे राहिले ते आता सदा स्मरणात राहील”

           एकदा तरी वेळ काढून मागे बघा. जुन्या आठवणी ताज्या करा. डोळे भरून येईल. मन प्रफुल्लित होईल
आणि........
      आत्ताचा हा क्षण जगण्याची नवी उमेद मिळेल. मग कधीही काहीच मागे राहणार नाही.....
☝#हरायचं तर आहेच #एक दिवस #'मृत्यु'कडून...*

 *तोपर्यंत #आयुष्याला #'जिंकून' घ्या...
  
*सत्कार्यासाठी काम करावं...सत्कारासाठी नाही..!!!*
*इतरांसाठी मनापासून झिजावं...दिखाव्यासाठी नाही..!!!*

Monday, 17 July 2017

शेती उद्योग व शेतकरी

शेतात काय पिकतं त्यापेक्षा
बाजारात काय विकतं हे ज्याला
कळतं तो माणूस जीवनात
निश्चितच यशस्वी होतो..
म्हणून शेतीला जोडधंदा म्हणून शेतीवरच आधारीत व्यवसाय करा कच्चा माल पण आपलाच व्यवसाय पण आपलाच मग पहा कशी प्रगती होईल त्या साठी शिकावं लागेल , शेती करण्यासाठी सगळ्यात जास्त शिक्षणाची गरज आहे. शेतात आंब्याची बाग आपली आंब्याच्या रस म्हणून विकला व माजा वाला श्रीमंत झाला, आपल्याला ते जमलंच नाही, सोयाबीन आपण पिकविली तेल विकून भलतेच लोक श्रीमंत झाले, ऊस आपण पिकवला साखर विकून भलतेच लोक श्रीमंत झाले,संत्र्याच्या बागा आपल्या संत्री आपण पिकवली दारू बनवून भलतेच लोक श्रीमंत झाले, भाजीपाला आपण पिकवला पण व्यापारी कधी बनू शकलो नाही कांदा 80 रु,किलो, टमाटर 80 रू किलो झाला तेव्हा किती शेतकऱ्यांना फायदा झाला अजिबात नाही , कारण काय तर आपण वडिलोपार्जित शेती करीत आहोत पिकवलेली उत्पादने कशी विकायची त्यावर आधारित व्यवसाय कसा करायचा हे शिकलोच नाही . शेतीवर आधारित फूड प्रोसेसिंग business कड़े कधी आपण लक्ष दिले नाही आता पूर्वजांनी ज्या चूका केल्या त्या करायच्या नाही शिक्षण घ्यायचं व शेती करायची त्यावर आधारित व्यवसाय करायचा व स्वयंपूर्ण व्हायचं शेती हा सुद्धा एक बिझनेस आहे व तो आम्हाला करता येतो सरकारला भीक मागायची वेळ येऊ द्यायची नाही करून दाखवू प्रत्येक शेतकऱ्यांनि ही शपथ घ्यायला पाहिजे.

Saturday, 8 July 2017

जगा आणि जगु द्या

*एका मुलाने एका मुलीशी लग्न केलं. ती मुलगी दिसायला खूप सुंदर होती.*

*तो तिच्यावर खूप प्रेम करायचा काही काळाने त्या मुलीला कोणता तरी skin चा प्रॉब्लेम झाला , एका वेगळ्याच आजाराने ती त्रस्त झाली.*

*त्या आजारामुळे त्या मुलीची सुंदरता हळूहळू कमी होत चालली, इकडे मुलीला हा आजार झाला तर लगेच मुलाला पण आंधळे पणा आला.*

*असेच दिवस चालले. काही दिवसाने मुलगी खूप कुरूप दिसायला लागली पण नवरा आंधळा झाल्याने त्याला काही कळत नव्हते व तो तिच्यावर तसाच प्रेम करायचा जसा पहीले करत होता.*

*त्या मुलीचा आजार वाढला व कालांतराने तिचा मृत्यू झाला. त्या मुलाला खूप वाईट वाटले त्याने त्या मुलीचा अंत्यविधी खूप प्रामाणिकपणे पार पाडला.*

*आता तो ते गाव सोडून दुसरीकडे स्थायिक व्हायचा विचार करत होता, तेवढ्ययात त्याला एका शेजारीने विचारले तू तरआंधळा एकटा कसा राहशील. त्यावर तो बोलला मी आंधळा कधीच नव्हतो , मी माझं अर्धे आयुष्य अांधळे पणाचं नाटक करत जगत होतो ,कारण जर मी तस केलं नसत तर माझ्या बायकोला त्या आजारापेक्षा मला काय वाटेल व माझं तिच्यावरील प्रेम कमी होईल हेच जास्त दुःख झालं असत, ती खूप प्रेमळ होती व एक चांगली बायको होती. मला तिला आनंदी ठेवायचं होत,*

*तात्पर्य :- काही वेळा आयुष्यात आनंदी राहण्यासाठी दुसऱ्याच्या शुल्लक  गोष्टी दुर्लक्ष करा आयुष्य अजून सुंदर बनेल.*

*2) समजून घ्या सोप्प आहे.*

*3) मी एकटा स्मित हास्य करू शकतो पण आपण सगळे जोरजोरात हसू शकतो.*

*हेच तर मानवी नात्याचं सौन्दर्य आहे. आपण एकमेकां शिवाय काहीच नाही,*

*ब्लेड ला खूप धार असते पण त्याने झाडं तोडता येत नाही.*
*कुर्‍हाड मजबूत असते पण त्याने केस कापता येत नाहीत.*

*प्रत्येकजण आपल्या जीवनात खूप महत्त्वाचं स्थान भूषवतात त्यांचा आदर करा जीवन फार सुंदर आहे जागा आणि जगू द्या.