Sunday, 20 August 2017

काळ बदलला की सर्वच बदलते

काळ बदलला की सर्वच बदलते

पुर्वी लोक   घराच्या   दारावर   एक   माणूस   ठेवायचे.
कारण   कुणी   कुत्रं   घरात   घुसू   नये.
आजकाल   घराच्या   दारावर        कुत्रं   उभं   ठेवतात.   कारण
कुणी   माणूस   घरात    येऊ  नये.

पुवीॅ   माणूस   जेवण   घरी  
करीत   होता.  आणि    शौचालय   बाहेर    होत.
आता   जेवण   बाहेर   करतो
आणि   शौचालय   घरात  आहे.

पुवीॅ   माणूस   सायकल   चालवायचा   
तो    गरीब   समजला   जायचा.
आता    माणूस   कारने  जिममध्ये  जातो 
अन् सायकल चालवतो !

पुवीॅ   लग्नात   घरच्या    स्रिया   जेवण   बनवायच्या.
आणि   नाचणार्‍या   बाहेरून यायच्या. 
आता   जेवण   बनवणाऱ्या    बाहेरून   येतात.
आणि   घरातल्या   स्रिया   नाचतात.

पुर्वी वायरीच्या फोनने
लांबची माणसे ही जोडली जायची.
आता बिनवायरीच्या मोबाईलने
जवळच्या नात्याचे दोर ही कच्चे केलेत!

पुर्वी माणुस चुलीवर स्वैपाक करायचा
मग LPG वर स्वैपाक करायला लागला.
आता चुलीवरच जेवण खायला
ढाबा शोधायला जातो !

पूर्वी रस्ते मातीचे अन्
माणसे साधी होती ...
आत्ता रस्ते डांबरी अन्
माणसे डांबरट झालेत ...

पुर्वी माणसं कशी शहाणी होती.
आता माणसं येडी अन्
हातातले फोन स्मार्ट झालेत !