Wednesday, 17 October 2018

गौतम बुद्धांचे जीवनपट

🌷गौतम बुध्दांचा संक्षिप्त जीवनपट 🌷
1) पंणजोबाचे नाव          :  राजा जयसेन
2) पणजीचे नाव             :  राणी जयंती
3) आजोबाचे नाव           :  राजा सिंहहनू
4) आजीचे नाव               :  राणी कच्चायना
5) वडिलांचे नाव             :  राजा शुध्दोधन
6) आईचे नाव                 :  राणी महामाया
7) मावशी ( सावत्र आई)  :  महाप्रजापती गौतमी
8) आत्या                       :  अमिता, प्रमिता
9) आत्या भाऊ               :  देवदत्त
10) सावत्र भाऊ              :  नंद, रूपनंद
11) चुलते                       : धौतोधन, शुक्लोधन, अभितोधन
12) गौतमांचे जन्मस्थळ    :  लुंबिनी  ( नेपाळ )
13) गौतमांचे जन्मवर्ष       : इ.स.पुर्व 563 (आषाढ पौर्णिमा)
14) वंश                           : शाक्य
15) पत्निचे नाव                :  यशोधरा ( गोपा )
16) यशोधराशी लग्न          :  ई.स.पूर्व  574
17) शाक्य संघाचे सभासद  :  वयाच्या 26 व्या वर्षी
18) मुलाचे नाव                 :  राहूल
19) गौतमांचा गृहत्याग       :  29 व्या वर्षी
20) सम्यक सम्बुध्द            :  ई.स.पूर्व  528
21) महापरिनिर्वाण            :  ई.स.पूर्व  583
....
....
.... नमो बुध्दाय.... जय भिम....

Saturday, 29 September 2018

लुगड्याची गोष्ट .*महात्मा ज्योतिबा फुले व साविञीबाई फुले

*लुगड्याची गोष्ट .*महात्मा ज्योतिबा फुले व साविञीबाई फुले

रात्रीची वेळ.. निरव शांतता .. तेलाच्या दिव्याचा मिण मिणता प्रकाश.

सावित्रीबाई पांघरूण अंगावर घेऊन झोपण्याच्या तयारीत..

ज्योतीराव कौतुकाने आपल्या बायकोच्या कपाळा वर हात ठेवतात.

",सावित्री. !" ज्योतीराव उद्गारले, "अगं, तुझं अंग गरम आहे. ताप येतोय का तुला ? "

"आहो, एवढं काही नाही .थोडी कण-कण आहे, झालं." ,सावित्रीबाई.

"अग पण ही कण-कण वाढली तर आपल्या शाळेचं कसं होईल? ,

मुलींच्या शिक्षणाच काय होईल?........

ते काही नाही,उद्याच वैद्यांना बोलावतो,
तू औषध घे म्हणजे लवकर बरी होशील."',--ज्योतीराव.

"आहो, हा ताप औषधाने नाही जायचा." सावित्रीबाई.

"मग?" ज्योतीरावांचा आश्चर्यचकित प्रश्न.

" तुम्ही मला शाळेत जाण्यासाठी अजून एक लुगडं देऊ शकलात तर हा ताप आपोआप जाईल." सावित्रीबाई.....

ज्योतीराव काहीशा नाराजीने दुस-या कुशीवर वळून झोपण्याचा प्रयत्न करू लागले.

त्यांचे विचारचक्र सुरु झाले.
लुगड्यासाठी ताप घेणारी सावित्री नक्कीच नाही...........

मग सावित्री असे का बरं बोलली?..........

तिच्याकडे एक लुगडं असताना ती दुसरं लुगडं का मागते?...........

आपल्याकडे जे पैसे आहेत ते शिक्षण कार्या करता आहेत ....

बायकोच्या लुगड्या करिता नव्हे ............

पण सावित्री शाळेत जाण्याकरिता लुगडं मागतेय म्हणजे नक्कीच काहीतरी कारण असणार...........

विचार करीत-करीत ज्योतीराव झोपून गेले.

दुस-याच दिवशी ज्योतीरावांनी सावित्रीबाई्च्या हातावर नवे लुगडे ठेवले.

बाईंच्या डोळ्यात पाणी आलं...........

लुगड्यासाठी खर्च करायला ज्योतीरावांना खूप त्रास झाला असणार,

कारण त्यांच्या जवळ जे पैसे आहेत ते शिक्षण कार्याकरिता......

सावित्रीबाई पक्के जाणून होत्या.
त्या नंतर बाईंना कधी ताप नाही आला.

ज्योतीरावांना आश्चर्य वाटले, "हे कसं काय.".........

लुगड्या साठी ताप घेणारी सावित्री नाहीच............

ज्योतीरावांनी सावित्रीबाईंचे शाळेतील सहाय्यक होते, त्यांची भेट घेतली. आणि त्यांना सविस्तर प्रसंग सांगितला.

त्यांनी उलगडा केला,"सावित्रीबाई शाळेत येतांना लोक अंगावर शेण चिखलाचा मारा करतात.

बाई शाळेत आल्यावर अंगावरील लुगड्यावरचे शेण चिखलाचे डाग धुऊन ओल्या लुगड्याने दिवसभर शाळेत शिकवितात.

त्या मुळे रात्री त्यांना ताप येत असेल.

परंतु आता तुम्ही त्यांना दुसरं लुगडं दिल्या पासून शाळेत आल्यावर लुगडं बदलून माखलेलं लुगडं धुऊन ठेऊन कोरड्या लुगड्याने शाळेत शिकवितात .

त्या मुळे आत्ता त्यांना ताप येत नसेल."

आत्ता ज्योतीरावांच्या डोळ्यात पाणी आलं..

सावित्रीबाईंच्या महानतेस ज्योतीरावांनी मनोमन प्रणाम केला...!!

*आपणही त्या दोन्ही महान विभूतींस प्रणाम करू या...*

*कारण त्यांच्यामुळेच् आजच्या स्त्रीयां ज्या कुठल्यही जातीच्या असो की धर्माच्या शिकु शकल्या ..!!*

कर्मयोग जगताना किती खोलवर विचार करावा लागतो.

हृदयस्पर्शी  अर्थपुर्ण अशी वाचनीय व समाजाभिमुख पोस्ट

*खरी शिक्षीका पुज्य सावित्रीबाईस कोटी कोटी प्रणाम*
🙏🙏🙏🙏🙏🙏

Monday, 17 September 2018

" सूर्यपुत्र यशवंत ( भय्यासाहेब )आंबेडकर "

" सूर्यपुत्र यशवंत ( भय्यासाहेब )आंबेडकर "
भय्यासाहेब यांचे खरे नाव यशवंत यांचा जन्म १२| १२| १९१२ रोजी मुंबई येथे झाला. लहानपणापासूनच त्यांना न्यूमॅनेटीक आणि पायाच्या पोलीयोसारख्या आजाराने ग्रासले होते.गावठी औषधांच्या उपचाराने त्यांना बरे करण्यात आले . त्यांचे शिक्षण मॅट्रीक पर्यंतच झाले. त्यांचे लग्न १९ एप्रिल रोजी मीराताईंशी झाले .
भय्यासाहेबांनी कधीही बाबासाहेबांच्या नावाचा फायदा घेतला नाही. त्यांनी स्वतःचे आयुष्य स्वतःच घडविले .त्यांनी सिमेंटचा कारखाना काढला. त्यानंतर मुंबई विमानतळाच्या परिसरात बांधकाम करणे हा नवीन उद्योग सुरु केला . त्यात त्यांनी कोणालाच वाटेकरी घेतले नाही .हा व्यवसाय सुरळीतपणे चालला होता.
नंतर त्यांनी बाबासाहेबांच्या चळवळीत भाग घेण्यास सुरुवात केली . त्यांनी भारतभूषण प्रिंटींग प्रेस हा छापखाना सुरु केला नंतर ह्या प्रेसचे बुद्धभूषण प्रिटींग प्रेस असे नाव झाले. १९४४ पासून बाबासाहेबांच्या मुखपत्रांचे व्यवस्थापन तेच पाहत होते. जनता प्रबुद्ध भारत यांचे ते सर्वे सर्वा होते.
बुद्धभूषण प्रिंटींग प्रेस मध्ये बाबासाहेबांचा " Thoughts on pakistan" हा इंग्रजी ग्रंथ भय्यासाहेबांनीच छापला बाबासाहेबांनी हा ग्रंथ भय्यासाहेब व मुकुंदराव यांना अर्पण केलेला आहे. बाबासाहेबांचा दुसरा एक ग्रंथ " federation versus freedom " हाही ग्रंथ भय्यासाहेबांनी आपल्या छापखान्यात छापला " Thoughts on linguistic states " हा ग्रंथ सुद्धा भाय्यासाहेबांनी छापला .
त्यानंतर बाबासाहेबांच्या आदेशानुसार वा. गो. आपटे लिखित " बौद्धपर्व " हा ग्रंथही भय्यासाहेबांनी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने आपल्या छापखान्यात छापून प्रसिद्ध केला. भय्यासाहेबांचे लिखाण अत्यंत तर्कशुद्ध आणि विचारगर्भ असे. त्यांच्या लिखाणातील व भाषणातील विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे म्हणी आणि वाकप्रचार यांचा मोठया प्रमाणावर वापर.
भय्यासाहेबांनी बाबासाहेबांची अनेक स्मारके उभारली . १ ले स्मारक त्यांनी मुंबई येथे बांधले डॉ.आंबेडकर या सभागृहाचे भूमिपूजन दि.२-४-१९५८ ला व उद्घाटन २२-६-१९५८ ला झाले. मुंबई नागरिकांच्या वतीने कफ परेड येथे बाबासाहेबांचा पुतळा बसविण्याचे ठरले .भय्यासाहेबांनी आग्रह धरला की २६ जानेवारी १९६२ रोजीच पुतळ्याचे अनावरण झाले पाहिजे. म्हणून शेवटच्या क्षणी कमी पडत असलेली रक्कम मह्पौरांना दिली. व ठरल्याप्रमाणे २६- जानेवारी १९६२ रोजी महाराष्ट्राचे राज्यपाल प्रकाश यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण झाले. चवदार तळे क्रांतीचे स्मारक म्हणून जेथे मनुस्मृतीचे दहन करण्यात आले. त्या जागेवर अशोक स्तंभाच्या धर्तीवर क्रांतीस्तंभ उभारण्यासाठीही त्यांनी पुढाकार घेतला . चैत्यभूमीच्या रूपाने बाबासाहेबांचे स्मारक व्हावे म्हणून भारतीय बौद्ध महासभेने दि.२०-३- १९५७ रोजी BMS कडे ४० बाय ४० ची जागा मागितली BMS ने ८ बाय ८ ची जागा मंजूर केली. परंतु मागणीपेक्षा एक इंचही कमी जागा घेणार नाही असा पवित्रा भय्यासाहेबांनी घेतला . अखेर BMS improvement committee ने ४० बाय ४० ची जागा मान्य केली . s/c federation आणि R.P.I पक्ष एकसंघ होता तो पर्यंत या स्मारकांना गती येत होती. जनताही आपला पै पैसा देत होती. जनता स्टेट बँकेसमोर रांगा लावून पैसे भरत होती. स्टेट बँकेत भरणा करावा म्हणून भय्यासाहेब कुलाबा ते दहिसर व कल्याण पर्यंत फिरफिर फिरले १९६६ साली डॉ. बाबासाहेबांचा ७५ व वाढदिवस येत असल्यामुळे हा जन्मदिवस " अमृत महोत्सव " म्हणून भव्य प्रमाणात साजरा करण्याचे भय्यासाहेबांनी ठरविले . या अमृत महोत्सव प्रसंगी डॉ. बाबासाहेबांचे जीवन कार्याचे प्रतिक म्हणून " भीम -ज्योत " "महु ते मुंबई " काढण्याचे ठरविले व २७-३-१९६६ रोजी "भीम -ज्योत " भारताचे मजूर मंत्री ना. जगजीवनराम यांच्या हस्ते प्रज्वलित करण्यात आली व ह्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार दादासाहेब गायकवाड होते.
भीम-ज्योत महू हून इंदौर ,भोपाळ ,होसिंगाबाद ,बैतुल,नागपूर ,पुलगाव ,औरंगाबाद ,येवला,नाशिक ,हरेगाव नगर ,संगमनेर ,देहू रोड, पुणे, सातारा वणी, पंचगणी ,महाबळेश्वर ,खेड ,मंडणगड ,दापोली, महाड ,पेण, पनवेल, कल्याण ,ठाणे मुलुंड ,राजगृह व चैत्याभूमिला आली. व ह्या भीमज्योत मध्ये मिळालेल्या धम्मदानातून चैत्यभूमी स्मारक उभारण्यात आले.
बाबासाहेबांच्या महापारीनिर्वाणानंतर भय्यासाहेब भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष झाले. "भारत बौद्धमय करीन " हा बाबासाहेबांचा संकल्प उराशी घेऊन भय्यासाहेबांनी काम सुरु केले. त्यांनी धम्मदीक्षेचे अनेक कार्यक्रम घेतले. धम्मपरिषदा भरविल्या धम्ममेळावे सर्वत्र होत होते. प्रचार सर्वत्र जोरात सुरु केला भय्यासाहेब आमदार असतांना त्यांनी विधानपरिषदेत बुद्धांच्या दलित समाजाच्या हक्कांबद्दल हिरीरीने बाजू मांडली बुद्धांच्या सवलती विषयी ते पंतप्रधान मोरारजी देसाईंना भेटले होते. भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष या नात्याने त्यांनी सिलोन, थायलंड ब्रम्हदेश ,सारनाथ व दिल्ली येथे झालेल्या जागतिक बौद्ध परिषदांमध्ये भारतीय बौद्धांच्या समस्या मांडल्या . खेड्यापाड्यात बौद्धविहारांचे उद्घाटन केले. १९६८ साली मुंबई येथे धम्मपरिषद भरविण्यात आली.व प्रमुख पाहुणे म्हणून दलाई लामा यांना बोलविण्यात आले. व ह्या धम्म परिषदेमध्ये अनेक महत्वपूर्ण ठराव पारित करण्यात आले. त्यात म्हणजे संस्कार विषयक आचार संहिता सर्वानुमते मान्य करण्यात आली. " बौद्ध जीवन संस्कार पाठ " या नावाचे पुस्तक तयार करण्यात आले. भय्यासाहेब हे बौद्धाचार्या चे जनक आहेत. उत्तर प्रदेश राज्यात देखील अनेक धम्मदिक्षांचे कार्यक्रम त्यांनी आयोजित केले होते.
भैय्यासाहेब हे पत्रकारितेत  कुशल होते.
जनता प्रबुद्ध भारत चे ते संपादक देखील होते.
धम्म प्रसार कार्याचा एक भाग म्हणून १९६७ मध्ये ११ वा धम्मचक्र प्रवर्तन दिनी भय्यासाहेबांनी स्वतः श्रामणेराची दीक्षा घेतली व त्या कालावधीत ते चैत्याभूमितच राहत होते. त्यांचे नाव "महापंडित काश्यप " असे ठेवण्यात आले होते.
१९५९ मध्ये संघरक्षित लंडनहून आले होते. त्यांनी भय्यासाहेबांची भेट घेतली होती. आणि त्यांना सांगितले " आपण जे धार्मिक कार्य करता ते न करता आपण ते आमच्याकडे सोपवा " आपण आमच्यासोबत काम करावे आम्ही त्याची योग्य ती किमंत देऊ .
स्वाभिमानी भय्यासाहेबांना हे रुचले नाही त्यांनी संघरक्षितांना सुनावले " मी माझ्या बापाची संस्था विकणार नाही आपणास जर काम करायचे असेल तर आमच्या संस्थेत येऊन करा . खर्याआर्थाने ते भीमरूपी हिमालयाचे गिर्यारोहक होते.
भय्यासाहेबांनी आपले संपूर्ण आयुष्य गोरगरिबांच्या सेवेसाठी झोकून दिले
चैत्याभूमिचे शिल्पकार , महापंडित काश्यप,सूर्यपुत्र भय्यासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन व कोटी कोटी प्रणाम
! जय भीम ! !! !!! नमो बुद्धाय !!!
                   
             

भैय्या साहेब आंबेडकरांचा (यशवंत राव आंबेडकर )जीवन पट

आज दिनांक १७/०९/ रोजी चैत्यभुमि चे शिल्पकार बौध्दाचार्यांचे जनक भैया साहेब आंबेडकर तथ: यशवंत भिमराव आंबेडकर ( पंडित काश्यप) यांचा स्मृति  दिवस आहे.

भैय्या साहेब आंबेडकरांचा (यशवंत राव आंबेडकर )  
                       जीवन पट
          
                                                                                १२/ १२/ १९१२:- बी.आय टी चाळ .                            १/५०, परळ, मुंबई येथे जन्म .
२७/०५/१९३५:-आई रमाई यांचे निधन .
१९४२:-जनता पत्राचे संपाद कत्व .
१९५२:- प्रबुद्ध भारताचे संपादकत्व .       १९५२ :-माणगाव (रायगड) मतदार विधानसभेची निवडणूक .
०५/०५/१९५५:- पत्रकार सम्मलेन संपन्न .
०६ /१२/१९५६:-पित्याच् छन्न हरपले .
२०/०३/१९५७:-बाबा साहेबांच्या स्मारकसाठी मुंबई महानगर पालिकेकडे पत्रव्यहार .
०३/१०/१९५७:-भारतीय बौद्ध महासभेच्या व्दितीय अध्यक्ष पदावरून केलेले भाषण .
१९५८ ते १९६०:- बौद्धजन पंचायत समितीचे कार्याध्यक्ष .
०२/०४/१९५८:-बाबासाहेबांच्या पहिल्या (डॉ.बाबा साहेब आंबेडकर स्मारक सभागृह-पंचायत, भोईवाडा स्मारकचे ) भूमिपूजन .
१९५७ ते १९६३:-धम्म दीक्षेचे देशभर कार्यक्रम .
२२/०६/१९५८:- पहिल्या स्मारकचे (पंचायत) अनावरण .
१४/०७/१९५८ ते ३०/१२/१९५८:- रिपब्लिकन पक्षाच्या ऐक्याचा पहिला यशस्वी प्रयोग .
१९५९:- अध्यक्ष. के.एम. कॉलनी,खार, भूमिहीनांचा सत्याग्रह .
१९६१ ते १०६६:- विधान परिषदेचे सद्स्य .
१९६३:-म्युनिसिपल कामगार संघटनेचे अध्यक्ष .
१०/०२/१९६४ ते १७/०२/१९६४:- स्मारक निधि संकलन प्रचार सप्ताह .
१९६४:-रिपब्लिकन पक्षाच्या मुंबई प्रदेशचे अध्यक्ष पद .
०३/०१/१९६५:- वरळी मुंबई येथे आव्हान सभा .
१४/०४/१९६६:-भीमज्योत (महू-मुंबई)ची सांगता .
१४/१२/१९६६:- पन्नाशी निमित्त दयानंद बांदोडकर यांच्या हस्ते सत्कार .
१०/१९६७ :-श्रामणेरची दीक्षा  (नाव पंडित कश्यप).
२३/११/१९६८:-  मुंबई बौद्ध परिषद संपन्न,प्रमुख पाहुणे दताई लामा .
०५/०७/१९७०:-पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या गव्हर्निंग बोर्डाचे सद्स्य .
१८/०४/१९७१:- जगन्नथराव . भातनकर मार्गाचे उदघाट्न .
१९७१ ते १९७५ :-मुंबई विद्यापीठाच्या समितचे सद्स्य .
२२/०५/१९७५:- श्रीलंका येथे दहव्या जागतिक परिषदेला भारतीय बौद्धांचे प्रतिनिधित्व .
०९/१०/१९७२:-लंडनला भेट .
२६/०१/१९७४:- रिपब्लिकन ऐक्याचा तीसरा प्रयोग .
२३/०२/१९७४:- रिपब्लिकन पक्षाच्या वतीने मंत्रालयावरील मोर्चाचे नेतृत्व .
०१/११/१९७४:-तिसर्या आशियाई परिषदेला उपस्थिती (दिल्ली) .
०९/०३/१९७५:- बौद्धजन पंचायत समितीच्या प्रथम परिषदेचे उदघाट्न .
१९७७:- बौद्धाच्या सवलती या प्रश्नावर लोकसभेची निवडणूक ईशान्य मुंबई मतदार संघ .
१०/०१/१९७७:-लोखंडाचे चणे पचवीणारी चळवळ भाषण .
०१/०५/१९७७:-महाड येथे क्रांतीस्तंभाचे उदघाट्न .
१९/०५/१९७७:- बौद्ध महासभेची पूर्ण बांधनी .
२३/०५/१९७७:- मोरारजी देसाई समोर (मुंबई) सवलती संदर्भात निदर्शन .
१७/०८/१९७७:-  प्रंतप्रधान मोरारजी यांची शिष्ट मंडळासह नवी दिल्लीत बौद्धाच्या सवलती संदर्भात भेट.
०८/१९७७:- 'तुम्हाला बौद्ध व्हायला कोणी सांगितले' ही पुस्तिका प्रकाशित .
१७/०९/१९७७:-मुंबई के. ई .एम. रुग्णालयात निधन .
०२/१०/१९७७:-चेत्यभूमिवर शोक सभा.....
*यांना ४१ व्या स्मृतीदिनानिमित्त विनंम्र अभिवादन🙏🏻🙏🏻🙏🏻*