Tuesday, 28 March 2017

पाम प्लेट्स

आप बिजनेस करने की सोच रहे हैं और आपके पास पैसे भी ज्यादा नहीं हैं, तो घबराने की जरूरत नहीं है। आज हम आपको एक ऐसे ही बिजनेस के बारे में बताने जा रहे हैं जिसे शुरू करने में सिर्फ 1.50 लाख रुपए की जरूरत होगी। इसे शुरू करने से पर्यावरण को बिल्कुल भी नुकसान नहीं पहुंचता है। 

 

यह बिजनेस केंद्र सरकार की एमएसएमई स्कीम से जुड़ा है, जिसके तहत बिजनेस शुरू करने पर आपको सरकार मदद भी करती है। सरकार ने जो बिजनेस की स्ट्रक्चरिंग की है, उस हिसाब से आपको सभी खर्च काटने के बाद सालाना 1.45 लाख रुपए तक प्रॉफिट हो सकता है। यानी हर महीने 12 हजार रुपए से ज्यादा इनकम आप कर सकते हैं।

 
आजकल शादी-ब्याह, पार्टी में खाने के लिए प्लास्टिक के प्लेट्स का उपयोग ज्यादा होता है। इससे पर्यावरण को नुकसान हो रहा है। इसी को देखते हुए सरकार डिस्पोसेबल प्लेट्स और फूड पैकिंग मैटेरियल के इस्तेमाल पर जोर दे रही है। पाम प्लेट्स पाम के पत्तों से बनता है। सूखे पत्तों से बना यह प्लेट सस्ता होने के साथ-साथ ईको-फ्रेंडली भी है। इसकी मांग मार्केट में ज्यादा है। इसकी को देखते हुए आप पाम प्लेट्स मैनफैक्चरिंग का बिजनेस शुरू कर सकते हैं।
कुल खर्च: 3.30 लाख रुपए 

 

वर्किंग कैपिटल: 47 हजार रुपए
वर्किंग कैपिटल में रॉ मैटेरियल, यूटिलिटीज एंड कंटिनजेंसीज, डब्ल्यूआईपी एंड फिनिश्ड गुड्स, सनड्राइ डेटर्स आदि शामिल है।  

मशीनरी पर खर्च: 2.83 लाख रुपए

Saturday, 18 March 2017

चैन और सोना

*छोटंस वाक्य आहे*
*पण अर्थ खुपच मोठा आहे.*

*अमीर के जीवन में जो महत्व*
*""सोने"" की ""चैन"" का होता है,*

*गरीब के जीवन में वही महत्व*
*""चैन"" से ""सोने"" का होता है..*

       🙏🙏

Monday, 13 March 2017

Business formula

व्यवसायवाढीचा "फॉर्म्युला'

आपण उद्योग, धंदा, व्यवसाय कोणता करतो, यापेक्षा तो कसा करतो याला खूप महत्त्व आहे. चीनमध्ये अशी म्हण आहे, "चेहऱ्यावर जर हसू नसेल तर त्या दिवशी दुकान उघडू नये.' प्रत्येकाच्या व्यवसाय-धंद्याच्या क्षेत्रामध्ये तोच धंदा-व्यवसाय उत्तम प्रकारे करणारे व भरपूर पैसे कमावणारे अगदी मोजकेच चार-पाच उद्योजक असतात. बाकीचे लोक रडतखडत किंवा अगदी नुकसानीत देखील व्यवसाय करीत असतात. धंदा तोच असतो, प्रॉडक्‍ट तेच असते, मार्केट तेच असते, तितकाच वेळ सर्वांकडे असतो. काही वेळेला तर भांडवल देखील कमी असते, तरी पण मोजके लोक चांगला धंदा करतात व बाकीचे रडतखडत किंवा कसा तरी धंदा चालवत असतात. मग दोघांमध्ये फरक काय आहे? फरक आहे तो ऍटिट्यूडचा म्हणजे वृत्तीचा. एकाचे धंद्यावर प्रेम असते, तर दुसरा करावा लागतो म्हणून किंवा आता दुसरे काय करू म्हणून धंदा करीत असतो.

याच वृत्तीवर- "ऍटिट्यूड'वर एक तत्त्व लागू होते. त्याला "पॅरेटोज लॉ' म्हणतात किंवा "80/20' म्हणतात. एकाच मार्केटमध्ये 20 टक्के उद्योजक मिळून 80 टक्के धंदा करतात. उदा. शंभरातील वीस व्यापारी. एकूण धंदा समजा शंभर कोटींचा असेल, तर ऐंशी कोटींचा धंदा ते करतात. उरलेले ऐंशी कोटींच्या धंद्यात मारामारी करतात, हे तत्त्व सगळीकडे लागू होते, कारखानदारीत, व्यापारात, पेठेत, रोडवर, डॉक्‍टर, वकील व इतर व्यवसायात. त्याचे प्रमाण कमी-अधिक असू शकते. अगदी नोकऱ्या मिळण्यामध्ये देखील म्हणजे काहींना अजीर्ण होईल इतके मिळते व काहींना उपाशी राहावे लागते. असे का होते, तर त्याला वृत्तीच कारणीभूत असते.

तुमचे जर तुमच्या व्यवसायावर प्रेम असेल, तर निश्‍चितच तुम्ही चांगला धंदा करू शकता. प्रेम कशाला म्हणतात, तर ज्याला कधी एकदा सकाळ होते व मी माझ्या उद्योगात जाऊन रमतो असे वाटते. जो कधीही आपल्या धंद्याबद्दल रडत बसत नाही, आपला धंदा वाईट आहे असे म्हणत नाही. धंद्यावर प्रेम असले की त्याला उत्साह असतो, जोश असतो, नवे विचार मनात येतात. अडचणी जरूर येतात; पण त्याला न घाबरता तो तोंड देतो, खचून तर निश्‍चितच जात नाही. उलट जोमाने कामाला लागतो. काळाप्रमाणे बदल करून नवीन व वेगळेपणा धंद्यात आणला जातो. अशा व्यक्तीच्या धंद्यावरील प्रेमाची प्रसन्नता त्याच्या वृत्तीत बदल करून जाते. चेहऱ्यावर हसू असते, त्यामुळे गिऱ्हाईकालाही आनंद वाटतो, अर्थात विक्री (सेल) वाढते. दुःखी किंवा निराश सेल्समनकडून किंवा मालकाकडून कोणाला काही घ्यायला आवडेल का? डॉक्‍टरचे व्यक्तिमत्त्व व त्याच्या चेहऱ्यावरील हसू बऱ्याच प्रमाणात आजार बरा करून जाते. त्यांना भेटल्यावरच आराम मिळतो, असे वाटते.

मालकाला उत्साह असला, की आपोआप हे "कल्चर' खालच्या लोकांपर्यंत पसरते; तसेच लोकही उत्साहाने वागतात. त्यांनाही काम करायला आवडते. ज्यांचे धंद्यावर प्रेम असते, ती संस्था-कंपनी अगदी नोकरापासून मालकापर्यंत उत्तम काम करते व अर्थातच भरपूर नफा कमविते. एकदा का आपल्याला आपला धंदा मनापासून आवडतो म्हटले, की आपोआपच त्याला लागणाऱ्या योग्य गोष्टी घडतात. तुमचा स्टाफ, कामगार, ग्राहक, बॅंका, शेअरहोल्डर, आजूबाजूचा समाज सर्व जण खूष राहतात.

कित्येक वेळेला, धंद्यामध्ये मागून आलेले लोक पुढे जातात, मोठे होतात. कारण अगोदरपासून त्या व्यवसायात असलेले लोक गाफील राहतात. धंदा ज्याप्रमाणे करायला पाहिजे, त्याप्रमाणे ते करीत नाहीत, योग्य बदल करीत नाहीत. निश्‍चितच कोठे तरी धंद्यावरचे प्रेम कमी झालेले असते. अलीकडे तर हे फार पाहायला मिळते. प्रत्येकाला दुसऱ्याचा धंदा चांगला वाटतो. तिथूनच गडबड सुरू होते. अनेक वेळेला मालकाचे वय झालेले असते, उत्साह कमी झालेला असतो, नवीन पिढी व्यवसायात येणार नसते; मग प्रेम कमी व्हायला लागते. धंदा तोच, पण आवड कमी झाल्यावर निश्‍चितच धंदा कमी व्हायला सुरू होतो.

त्यामुळे जो उत्साही आहे, ज्याला आपला धंदा आवडतो, त्यालाच संधी दिसते. त्याच्या मनाची दारे कायम उघडी असतात व तेथेच लक्ष्मी येते. "आज हवाच खराब आहे', "खूप कॉम्पिटीशन वाढली आहे', "पूर्वीसारखे मार्जिन राहिलेले नाही', "धंद्यात दम नाही', "सरकारची पॉलिसी बरोबर नाही', "जागतिक मंदी आहे', "पाऊसच पडलेला नाही'.. अशी कारणे बऱ्याचदा ऐकू येतात. ते अगदी खरेही असेल; पण नुसती चर्चा करून काय होते, बोलून काय होते? अशी वाक्‍ये रोज पावलो-पावली ऐकायला मिळतात. एकतर आपल्याला आपला व्यवसाय चिकाटीने करायचा असेल, तर अशी वाक्‍ये बोलूच नाहीत व तसे बोलणाऱ्यांपासून चार हात लांब राहावे. कारण त्यांना फक्त रडायला खांदा हवा असतो.

असे रडण्याऐवजी "आपल्याला तर आपला धंदा आवडतो आहे, आपण खूष आहोत, मस्त आहोत, आपल्याला वेळच नाही असे रडायला', अशी वृत्ती ठेवून पुढे चालले पाहिजे. "आहे तोच व्यवसाय-धंदा उत्तम आहे, तो मी उत्तम प्रकारे करणार आहे, काळाबरोबर बदलणार आहे, मी "टॉप'च्या बिझनेसमनमध्ये कायम असणार आहे,' असा विश्‍वास, प्रेम व वृत्ती हवी. हा "फॉर्म्युला' वापरून पाहा.

Monday, 6 March 2017

Jokes

बायको: (बाथरूम मधून लाडिक आवाजात) अहो मी साबण लावलाय जरा तुमच्या मजबूत हातानी चोळून देता का?

नवरा 😳 : आलो आलो आलो आलोच (पेपर वाचता वाचता तडक बाथरूम कडे धाव घेऊन आत घुसतो)

बायको: अहो ह्या बादलीभर कपड्याना साबण लावून ठेवलाय. नीट रगडून धुवा. मला स्वंयपाकाचं काम आहे मी जाते.

नवरा  : 😰

Moral:
*Mutual Fund Investments are subject to market risks, please read scheme related documents carefully, before investing.*....😂😂😜

Thursday, 2 March 2017

स्वाभिमानी नेतृत्व

आद.अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या विषयी महत्वपूर्ण माहिती; नक्की वाचा..!
"भीमरूपी हिमालयाचे गिर्यारोहक प्रकाश आंबेडकर"
नायक कसा असावा ?
नायक असा असतो की स्वतःचा स्वार्थ न बघता
समाजाची सेवा करणे ,स्वाभिमानी बाणा दाखवून
समाजाच्या उन्नतीसाठी जगणे तोच खरा
समाजाचा नायक अर्थातच नेता होऊ शकतो. समाज म्हणजे विशिष्ट
जातीचा किवा धर्माचा समूह नव्हे तर अखिल मानव
जातीचा समूह होय.
अशाच एका नायकाचा वेध आपण
घेणार आहोत ,
हा वेध घेताना कोणी याला
राजकीय प्रमोशन मानेल किंवा काही पण
नायक नेत्याचे त्याहीपेक्षा एका समाजकारन्याचे
गुणविशेष आणि कौतुक झाले पाहिजे आणि जनतेला आपला नेता
निवडायला पर्याय दयायला हवा . याचा असा अर्थ नव्हे कि इतर
कोणी नेता वाईट आहे किवा नेतृत्व करू शकत
नाही तरीही जनतेने
बहुआयामी नेतृत्व स्वीकारून आपल्या
राजकीय ,सामाजिक ,आर्थिक ,शैक्षणिक इ .
वाटचालीस गतिमान कराव .असाच एक नेता म्हणजे
"बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर" , डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांचे
नातू म्हणून असली तरी
स्वताची वेगळी ओळख
राजकीय ,सामाजिक आणि धम्मकार्यात
केलेली आहे .कोणीतरी
म्हटलं होत कि बाबासाहेब उतुंग हिमालय आहेत तर त्या
हिमालयाचे गिर्यारोहक बाळासाहेब आहेत . बाबासाहेबांचे विचार पुढे
नेण्याचेच काम प्रकाश आंबेडकर करत आहेत अस वाटत ,सामाजिक
बदल झाल्याशिवाय राजकीय बदलाला काही
अर्थ उरत नाही ,जातीअंताची
लढाई बाळासाहेबांनी सुरु केलेली
केलेली आहे त्याचा संदर्भ म्हणजेच
बाबासाहेबांनी मांडलेले अमुल्य विचार Annihilation Of Caste या ग्रंथात आढळतात . बाळासाहेब आंबेडकरांनी
कधी तडजोडीच्या राजकारणाला महत्व दिल
नाही समाजहिताच्या गोष्टीपुढे सत्तेला
नाकारणारे बाळासाहेब रक्ताचेच नाही तर खऱ्या
आंबेडकरी विचारांचे वारसदार ठरतात म्हणून आम्हास
ते इतराहून स्वाभिमानी आणि समाजाला दिशा देणारे नेतृत्व
वाटतात याचा प्रत्यय व्ही . पी . सिंह
यांच्या सरकारच्या वेळेला आला , निवडणूक पूर्व जनता
दलाशी राजकीय समझोता करून सरकार
सत्तेत आल्यावर मंत्रीपदाची
व्ही . पी . सिंह यांची ऑफर
न स्वीकारता आंबेडकरी समाजहिताच्या
महत्वपूर्ण गोष्टी व्ही . पी
. सिंहाकडून करवून घेतात त्यात १९५६ पासून अपूर्ण
राहिलेली बाब ज्याचा अपमान बाबासाहेबांच्या मुलाला आणि
प्रकाश आंबेडकरांच्या वडिलांना मोरारजी देसाई पंतप्रधान
असताना सहन करावा लागला सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर
मोरारजीना भेटावयास गेले असता नवबौद्ध ,बौद्धांचा समावेश
अनुसूचित जातीत करावा त्यावर चोरांचे मोर असलेले
मोरारजी म्हणतात कि कोण सांगितले होते महारांना बौद्ध
होण्याचे , त्यावर भैय्यासाहेब म्हणतात आमच्या बापाने आणि
तेथून निघून जातात ,हीच मनातील सल
आणि अखिल भारतातील बौद्ध जनतेच्या सुवर्ण
अक्षरात लिहावा असा हा क्षण बौद्धांचा समावेश अनुसूचित
जातीत व्ही. पी .सिंग यांना
करायला भाग पाडतात हेच उत्तर आहे जे आरक्षणाचा लाभ घेतात
आणि वर तोंड करून विचारतात प्रकाश आंबेडकरांनी
समाजासाठी काय केल ? संसदेमध्ये बाबासाहेबांच्या
महापरीनिर्वाणानंतर संसदेमध्ये तैलचित्र , भारतरत्न
किताब हे बाळासाहेबांच्या मुस्तद्देगिरिचे फलित आहे.
व्ही.पि. सिंहानी दिलेली
मंत्रीपदाची ऑफर नाकारून
आंबेडकरी समाज हिताच्याच गोष्टी की ज्यात
मंडल आयोगानुसार नवबौद्ध आणि बौद्धांचा अनुसूचित
जातीमध्ये समावेश, बाबासाहेबांचे संसदेमध्ये तैलचित्र,
भारतरत्न, टपालाच्या तिकिटावर आणि त्या नंतर बाबासाहेबांना नोटेवर
पण आणायचा प्रयत्न होता परंतु भाजपने "मंडल विरुद्ध कमंडल"
केल्यामुळे सरकारचा पाठींबा काढला , त्यानंतर
राजीव गांधीचे सरकार आले
राजीव गांधीनीही
बाळासाहेब आंबेडकराना मंत्रिमंडळात सहभागी होण्याचे
आमंत्रण दिले ,परंतु कॉंग्रेस च्या या दाव्यापुढे बाळासाहेब नमले
नाहीत यामुळे आंबेडकरी चळवळ
दाबली जाण्याची
भीती होती ,त्यामुळे
समाजहिताच्या गोष्टी लक्षात घेऊन
मंत्रीपदावर २ वेळा लाथ मारनाराच समाजाचा खरा नायक
होऊ शकतो आणि असायलाच हवा .इतर नेते समाजाच्या प्रश्नापेक्षा
,कोणाला धम्म न स्वीकारता
जातीपातीच राजकारण करून पंतप्रधान
व्हायचं आहे कोणाला एकही आमदार न आणता
उपमुख्यमंत्री व्हायचं आहे,
कोणी पंतप्रधान होऊन जर विशिष्ट धर्माने भारताला त्या धर्माचे अनुयाही अधिकारशाहीने जर झाले
असते तर मनमोहन सिंगानीही देश
शिखमय केला असता .
प्रकाश आंबेडकरांचे वक्तृत्व आणि विद्वत्ता अतिशय उच्च दर्जाची राहिलेली आहे , बाबासाहेबांच्या
आवाजांच्या जुन्या रेकॉर्ड्स चेक केल्यास आवाजातील
साम्य आढळून येते, अनुवांशिक गुणांचे हे द्योतक म्हणावे लागेल
तशाच दर्जाच इंग्रजी बोलण्यात बाळासाहेब सक्षम आहेत याचा अनेकवेळा प्रत्यय संसदेमध्ये, दूरदर्शन आणि भारतात
अनेक ठिकाणी विद्यापीठामध्ये
इंग्रजी व्याखानावरून लक्षात येते इतर नेत्यापेक्षा
इंग्रजी बोलण्यात सरस आहे हे मात्र
नक्की .
असाच एक प्रसंग ३० ऑगस्ट २००१ मध्ये डरबन , दक्षिण
आफ्रिका मध्ये भारतातील १२५ खासदाराचे नेतृत्व करताना
आला. संयुक्त राष्ट्राचे अधिवेशन त्यावेळी भरले होते त्या अधिवेशनात बोलताना आफ्रिकेमध्ये काळा गोरा हा वंशवाद या
धर्तीवर भारतात होणारा जातिवाद हा खूप मोठा आहे आणि यालासुद्धा संयुक्त राष्ट्राच्या कार्यक्रमात सहभागी करून घ्याव पण तत्कालीन अध्यक्ष कोफी अन्नान यांनी नकार दिला तरी आंतरराष्ट्रीय पातळीवर
भारतात होणाऱ्या जातीय अन्याय अत्याचाराची नोंद घेतली गेली याचे श्रेय प्रकाश आंबेडकराना जाते हे विरोधक आणि मनुवादी पक्षही त्यांच्या असणाऱ्या अफाट विद्वत्तेला मानतात .
प्रकाश आंबेडकर आणि बाबासाहेबांच्या कुटुंबावर आरोप करणारे अतिशय खालच्या पातळीवर जाऊन हल्ला करतात पण
बाळासाहेब आपल्या कर्तुत्वाने आणि विद्वत्तेने त्याला उत्तर देतात ,
त्यांना ब्राह्मणकन्येशी विवाह केला म्हणून
काही लोक विरोध करून आंबेडकरी
घराण्यातील स्त्रीबद्दल वाईट बोलतात, पण
बाबासाहेबाच्या विचारानुसारच जाती अंतचाच हा भाग आहे, आणि इथे ज्यांना माहिती नसेल त्यांना हे सांगता येईल
की बाळासाहेबांच्या पत्नी "अंजलीताई मायदेव-आंबेडकर" ह्या कुणी
रूढीवादी ब्राह्मणकन्या नव्हेत तर बौद्ध
विवाह पद्धतीने विवाहबद्ध होऊन बौद्ध
धम्माची दिक्षा ग्रहण केलेली आहे
.मुळात प्रकाश आंबेडकर यांच्या पत्नी
अंजलीताई सच्च्या आंबेडकरवादी आहेत. कर्वे Instititute च्या समाजसेवा विभागाच्या मुख्य सदस्य आहेत, सीएसपी प्लान च्या दिल्ली,मुंबई आणि पुणे च्या मुख्य सल्लागार, आदिवासी, मागासवर्गीय ज्या आंबेडकरी समाजाच्या हितासाठी सरकारच्या मुख्य समित्यावर सल्लागार
म्हणून काम पाहतात . युनिसेफ आणि TATA सोशल च्या सदस्य
म्हणून काम पाहतात .ग्रामीण भागातील
दलित महिला सबलीकरणासाठी
असलेली "चैतन्य " या NGO च्या सल्लागार समिती सदस्य, सम्यक समाज च्या प्रतिष्ठान च्या विश्वस्त, अनेक समाजोपयोगी संस्थेत कार्यरत आहेत
.
बाबासाहेबानंतर भैय्यासाहेब , मीराताई आंबेडकर
यांनी समाजासाठी धम्मकार्यात वाहून दिले ,
बाबासाहेबांच्या महापरीनीर्वाणानंतर
बौद्धांची संख्या ०. ७ वरून ५ -६ टक्क्यावर
आली याचे श्रेय भैय्यासाहेब नंतर मीराताईना
जाते हे नक्की भैय्यासाहेबांच्या निधनानंतर
मीराताईनी यशस्वीपणे
धम्मकार्य सुरु ठेवून उतारवयातही संपूर्ण भारतात
अविश्रांत धम्मासाठी फिरतात हे नवल आहे आणि
तितकीच मोलाची साथ बाळासाहेब आंबेडकर
देत आहेत याच समाजान जाण ठेवण गरजेचे आहे .
बाळासाहेबांची भूमिका नेहमी बहुजन
वर्गाला ग्राह्य धरूनच राहिलेली आहे मंडल
आयोगापासून सुरु झालेला लढा ओबीसी
साठी थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेला , स्वताला
ओबीसी म्हणवणारे नेते छगन भूजबळ ,
गोपीनाथ मुंडे आपापल्या पक्ष श्रेष्टीच्या
भीतीमुळे सर्वोच्च न्यायालयात केस दाखल
करण्यास घाबरले पण तिथेही बाळासाहेबांनी
अंगावर कोट चढवून ओबीसींना न्याय
हक्क मिळवून दिला , स्वता चळवळीला स्वताचे नेतृत्व
करून त्याचे श्रेय किवा कुठली लालसा ठेवली
नाही . राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर सतत
तोफ डागली , राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
कधीच १५ ऑगस्ट अर्थात स्वतंत्र दिन आणि
प्रजासत्ताक दिन साजरा करत नाहीत म्हणून
कार्यकर्त्यासह त्यांच्या मुख्यालयात जाऊन तिरंगा झेंडा फडकविला
त्याचे स्पष्टीकरण प्रमोद महाजनांना द्यावे लागले .
दरम्यानच्या काळात ९५ ला उत्तर प्रदेशात
निवडणुकीमध्ये भारिप ने आपले बरेच उमेदवार उभे केले
होते आणि विशेष बाब म्हणजे यातील बऱ्याच उमेदवारांना
२० हजार पेक्षा जास्त मते मिळाली होती
पण मानुवाद्याना त्याचा फायदा होईल आणि बसपा चे नुकसान होईल
म्हणून चळवळीची बांधिलकी
म्हणून तिकडचे पक्ष कार्य बंद केले परंतु इकडील
बसपाचे लोक हे विसरून बाळासाहेबावर बदनाम करण्याचे काम करतात
.
२००० च्या काळात भारिप ने स्वबळावर सत्ता मिळविण्याचे कार्य केलेले
आहे ,काहीना मंत्री मग ते
कोळी समाजाचे दशरथ भांडे , रामदास बोडखे यांना केले ,
भारिप चे ३ आमदार , खणन विकास महामंडळाचे अध्यक्ष नागपूरचे
रणजीत मेश्राम यांना केले परंतु
जातीवादी विलासराव देशमुख
यांनी शरद पवारांचा पाढा गिरवत आंबेडकरी
चळवळ दाबण्याचे काम केले सरकार अल्पमतात आले असताना या
आमदार आणि मंत्र्यांना बंगलोर ला पळवून नेले , भारिप चे
खच्चीकरण इथल्या मनुवाद्यांनी
केली , तरीही
काही प्रमाणात का होईना भारिप ने
स्वाभिमानीपणे सत्ता हातामध्ये टिकवली ,
कासार समाजाच्या स्त्रीला महाराष्ट्राच्या इतिहासात
जिल्हापरिषदेचे अध्यक्ष बनविले , मनसे सारखा पक्ष मिडिया कडून
महानगरपालिकेला प्रमोट केला गेला तिथे एका बौद्ध स्त्री
ने अकोल्याचे महापौर व्हाव हे दाबल्या गेल .
बाळासाहेबांनी स्वतः लोभापासून दूर राहून अनेकांना मोठ
केल पण अनेक जन बेईमान झाल्याचे दिसतात ,
व्यक्तीवादाला बाळासाहेबांनी
कधीच महत्व दिल नाही
समाजासाठी तडजोड केली नाही
, ते म्हणतात " लोक येतील आणि जातील
लोकांपेक्षा चळवळ टिकणे खूप महत्वाच आहे ". जे गेले त्याचं
अस्तित्वच संपल हे आपल्या समोरील उदाहरण
आहे .
बाळासाहेबांनी ज्यांना मोठ केल त्यामध्ये
नीलमताई गोर्हे ,चंद्रकांत हंडोरे , मखराम पवार
,भीमराव केराम ,रामदास बोडखे ,भांडे
,सूर्यवंशी , हनुमंत उपरे असे
कितीतरी उदाहरणे देता येतील
पण व्यक्तीपेक्षा आंबेडकरी चळवळ
महत्वाची आहे व्यक्ती
येतील आणि जातील पण चळवळ आणि
समाजकारण महत्वाच आहे . बाळासाहेबांनी अनेक
महत्वाची प्रश्नांना हात घालून लढा दिलेला आहे यात
Enron चा प्रश्न असो कि वेगळ्या विदर्भाचा प्रश्न असो कि
विदर्भातील कापसाचा प्रश्न ,शेतकऱ्यांच्या आत्महत्या
बाबतीतही पंतप्रधान आणि सोनिया
गांधीनाही कोर्टात खेचणारे एकमेव नेते ,
डाऊ कंपनीचा लढा आसो वा लावासा प्रश्न कि
मुस्लीमासाठी सच्चर आयोग असो विविध
प्रश्न हाताळून योग्य लढा दिला .
समाजाने स्वताच चळवळीचे नेतृत्व करून रिपब्लिकन
चळवळ गतिमान करून बाळासाहेबांच्या मागे उभे राहावे अन्यथा ६०
वर्षापासून चाललेली परिस्थिती कायम ठेवून
इथल्या मनुवाद्याचे गुलाम बनून राहावे हा ज्याचा त्याचा प्रश्न
आहे . प्रत्येक नेत्याची मीमांसा करून
एकच नेता आणि पक्ष स्वीकारून आपला स्वाभिमान
जपावा हे या निमित्ताने सांगावयास वाटते.
एक डोळस संपूर्ण आभ्यासून पहले असता
बाळासाहेबांची भूमिका हि आंबडेकरी
चळवळीला अनुसरून राहिलेली आहे याचा
अभ्यास सर्वांनी करावा अगदी रिपब्लिकन
ऐक्यापासून ते आजवर , मुळात रिपब्लिकन ऐक्य आणि ते तुटण
आजवर चालत आलेली रिपब्लिकन
चळवळीचा अभ्यास प्रत्येकाने करून प्रत्येक
नेत्याची चाचपणी केल्यास प्रकाश आंबेडकर
त्यात पास होतात हि वस्तुस्थिती आहे . इतर नेते
कितीवेळा एकत्र आलेत आणि प्रकाश आंबेडकर
नाहीत मग काय झाल याचा एकाच अर्थ आहे कि इतर
एकत्र येउन काहीच होऊ नाही कारण
जी महाराष्ट्रात मोठी ताकद आणि इतर
समाजाकडूनही त्यांना पाठींबा आहे हा
सर्वात मोठा प्लस point आहे .ऐक्य झाले तेव्हा काय बदल
होतो तो बाळासाहेबांनी पक्षाचा कुशल प्रशासक बनून
पक्षाला राजकीय मान्यतेपर्यंत पोहचवल होत हा
इतिहास आहे . ऐक्यानन्तर युती करायला आलेल्या
शरद पवारालाही २ तास दाराजवळ वाट पाहायला लावून
विचारांती युती करून त्याचे फलित म्हणून ४
खासदार निवडून आले होते हा इतिहास आहे पण
आपली दुकानदारी चालत नाही
हा माणूस पक्ष वाढवतो पक्षाला ओबीसी
व इतर समाज जोडत आहे पक्षाची आणि
चळवळीची खरेदी
विक्री आपल्याला करता येणार नाही
म्हणून हा माणूस अडसर होतो म्हणून गवई नि त्या काळात
पक्षातून हकालपट्टी करून ऐक्य तोडण्यास मोठा रोल
प्ले केलेला होता आणि त्याला रामदास आठवले नि
सहमती दाखवली होती
हेही तितकच खर आहे पुराव्यासहित पहावयाचे
असल्यास संजय मून यांनी त्यावेळेला "रिपब्लिकन
ऐक्याचे मारेकरी " हे पुस्तक ऐक्याचे ढोल
वाजवणार्यानी जरूर वाचावे आणि ऐक्यासामधी
तथ्य जाणून आणि नीट अभ्यास करून बोलायला हव .
ज्यांच्यासोबत पुन्हा ऐक्य करावयाचे त्यांचे अस्तित्व आणि
चळवळीला विकण्याचे काम आणि मागील
अनुभव पाहता बाळासाहेब त्यांच्यासोबत जात नाही हा
त्यांचा "अहंकार " नाही तर तो त्यांचा स्वाभिमान आहे
आजोबांच्या विचाराना नातू तरी फाटा देऊ शकत
नाही.
राहला प्रश्न अकोल्याचा तर बहुजनांना सोबत घेऊन सत्ता
कशी मिळवावी हे अकोला आणि किनवट ने
बहुजनांना दाखवून दिले नुसते ते अकोल्यात नाही पण
संपूर्ण महाराष्ट्रात राबत असतात आणि भारिप म्हणजेच
भारतीय रिपब्लिकन पक्ष याला बहुजन
महासंघाची जोड लावलेली आहे त्यामुळे
इतरासारखे रिपब्लिकन पक्ष नावागोदर किवा नंतर कंसात लिहिलेलं
आढळत नाही . नागपुरात नगरसेवक
,अमरावती ,औरंगाबाद ,परभणी , नांदेड
,बुलढाणा ,बीड अशा अनेक ठिकाणी सत्ता
हस्तगत केलेली आहे त्यात १ महापौर ,३ आमदार
,जि . प . अध्यक्ष , कुणी नगर सेवक
,कुणी जि . प . सदस्य ,कुणी प . स .
सदस्य ,अनेक पंचायत समित्या आणि नगरपालिका ताब्यात आहे
तेही स्वबळावर मग बाळासाहेब हि जी
स्वाभिमानाची चळवळ एकट्याने चालवत आहे तर मग ते
खूप चुकत आहेत ? मुंबई मध्ये आठवले नि युती
करून १ नगर सेवक आणला तिथे बाळासाहेबांनी
स्वबळावर १ नगरसेवक निवडून आणला . मग आपल्या
सर्वांची हि जबाबदारी नाही का
कि इतर नेत्याची हि चाचपणी करायला
हवी इतर नेत्याची राजकीय
ताकद काय कि त्यांना नेते म्हणून विनाकारण स्वीकाराव ?
परत एकदा इतिहासात डोकावलं तर शिवसेनेची स्थापना
आणि त्यानंतर सुरु झालेली गुंडगिरी
याची परिसीमा बाळ ठाकरेनी
गाठली होती ,मुंबई मध्ये
दहशतीच वातावरण निर्माण करून एकप्रकारे
हुकुमशाहीला चालना बाळ ठाकरे आणि शिवसेनेने
केली होती ,त्याच काळात
मागासवर्गीयावरील अत्याचाराच्या विरुद्ध बंड
करण्यासाठी दलित panther ची स्थापना
झाली , शिवसेनेने मद्राश्यांच्या विरोधात पेटवून दिल्यावर
मद्रास्यांची घरं, दुकानं व हॉटेलं जाळण्यात
आली,त्यानंतर ठाकरेनी कानडी
लोकांच्या विरोधात रणशिंग फूंकले. या लढ्यात मराठी विरुद्ध
कानडी अशी बत्ती पेटवून
सामान्यांच्या जिवाची होळी
केली. एक दोन नाही तर चक्क ५९ लोकांचा
मृत्यू व २७४ लोकं जखमी झालीत. त्यानंतर
जून १९७० माकपा चे आमदार आणि युनियन लिडर कृष्णा देसाई
ची हत्त्या घडवून आणली . इथवर ते
थांबले नाही १९७४ ला दलित panther नेता भागवत
जाधव यांचा खून केला आणि आंबेडकरी समाजात प्रचंड
दहशत निर्माण केली त्यानंतरही विदर्भात
दलितावर हल्ले सुरूच ठेवले , कधी दक्षिण
भारतीय ,कधी शीख ,
कधी मुस्लिम तर आंबेडकरी जनतेवर या
नराधमानी हल्ले सुरूच ठेवले हा सगळ्या माजामागे
कॉंग्रेस होती आणि शरद पवारांचा वरदहस्त होता
म्हणून शिवसेनेने गुंडगिरी निर्माण केली ,
त्यानंतर “Riddles in Hinduism”. हे बाबासाहेबांनी
लिहिलेला ग्रंथ महाराष्ट्र सरकारने प्रकाशित करू नये यात हिंदू देव
देवतांचा अपमान आहे हि भूमिका तेव्हा बाळ ठाकरेनी
घेतली होती . त्या वेळी
जवळपास ४ महिने वातावरण आंबेडकरी जनता विरुद्ध
शिवसेना अस राहील होत , जानेवारी १९८८
ला निघालेल्या शिवसेनेच्या मोर्चाने लोकांना चिथावणी देऊन
जमवल " ज्याच खर रक्त हिंदूच असेल त्यांनी या
मोर्चात याव" , या मोर्चात बाबासाहेबावर अभद्र शब्दात बोलल्या गेल ,
त्यात आनंद दिघे ह्या शिवसेनेच्या नेत्यापेक्षा या नराधमाने अकलेचे
तारे तोडून बाबासाहेबांच्या आई माता भीमाबाई बद्दल
संशयी भाषा वापरून सकपाळ ते आंबेडकर कसे झाले अशा
प्रकारचे वक्त्यव्ये करून आंबेडकरी समजला चिथावले .
याचा राग म्हणून ५ फेब्रुवारी १९८८ ला प्रकाश
आंबेडकर यांच्या नेतृवात मंत्रालयावर मोर्चा काढला
आंबेडकरी तरुण आणि शिवसैनिकामध्ये तणावाचे वातावरण
निर्माण झाले त्यातच हुतात्मा स्मारकाजवळ आपल्या
आंबेडकरी तरुणाकडून नासधूस झाली ,
दुसऱ्या दिवशी आताचे नकली
ओबीसी नेते छगन भुजबळ
यांनी बाळ ठाकरेच्या आदेशाने चबुतरा गोमुत्राने धार्मिक
विधी करून शुद्ध करून मनुवादी
विचारसरणीचा परिचय करून दिला . पुढे मंडल आयोगाचा
लढा सुरु झाला प्रकाश आंबेडकरानी व्ही.
पी . सिंगच्या मदतीने लढून
यशस्वी केला ,त्याच काळात छगन भुजबळ ला
स्वताची जाणीव होऊन शिवसेनेला जय
महाराष्ट्र केला .
इथवरच बाळ ठाकरे आणि आणि त्याच्या सेनेने थांबले
नाहीत तर मराठवाडा विद्यापीठाला
बाबासाहेबांचे नाव देण्यास विरोध केला , मराठा आणि दलित वाद निर्माण
करून १४ वर्षे दलितावर अत्याचार सुरु ठेवला , या काळात
बाबासाहेबावर चिखलफेक करण्याचे काम बाळ ठाकरे ने केले ,
'बाबासाहेब निजामाचे हस्तक' ,'ज्याच्या घरात नाही
पीठ ते मागतात विद्यापीठ' ,
महारानी आमच्या नोकऱ्या पळवल्या
अशाप्रकारची विधाने केली
तितकीच चिथावणीला साथ राज ठाकरे ने
दिली. मराठवाड्यात आंबेडकरी समाजावर
हल्ले करण्याचे आदेश राज ठाकरे देत होता , हे सध्या मनसे
मध्ये काम करत असलेल्या तरुणांनी लक्षात घेतलं
पाहिजे , अखेर नामांतर न होता नामविस्तार झाला
तत्कालीन शरद पवार सरकारचे असलेले
मंत्री रामदास आठवले यांनी समझोता करून
या वादावर पडता टाकण्यास मदद केली परंतु नांदेड
विद्यापीठाला स्वामी रामानंद तीर्थ
विद्यापीठ असे नामकरण केले पण मराठवाडा
विद्यापीठासमोर बाबासाहेबांचे नाव लावून नामविस्तार केला .
या लढ्यात पोचीराम कांबळे ,गौतम वाघमारे यांना हुतात्म
आले परत यांचीच टिंगल म्हणून बाळ ठाकरे ने गौतम
वाघमारे ना बेवडा संबोधून आणखी ठिणगी
टाकली अनेक लोकांचे प्राण गेले घरे गेली ,
या सर्वाना कारणीभूत बाळ ठाकरे आणि कॉंग्रेस जबाबदार
होती . अलीकडेच बाळ ठाकरे ने
मरण्यापूर्वी एका tv मुलाखतीत एक मोठा
खुलासा केला कदाचित सर्व आंबेडकरी लोकांना माहित
नसेल पण मराठवाडा विद्यापीठाची
settlement करण्यासाठी रा . सु . गवई ना
जेवण्यासाठी बोलावलं आणि विद्यापीठाचे
नामांतर न करता हा नामविस्तार करू त्यावर जेवताना रा . सु . गवई
लगेच तयार झाले पुढे काय झाल आपल्यालाच माहिती
आहे आणि मी कधी नामांतराला विरोध
नाहीच केला हि भूमिका बाळ ठाकरे ने मांडली
. या वरून काय सिद्ध होते ,आंबेडकरी
नेत्याची हि लाचारी कि
स्वाभिमानी वृत्ती यावर समाजच अधिक विचार
करू शकतो या निमित्ताने सांगावे वाटते .
वर थोडक्यात उल्लेखलेल्या बाळ ठाकरे आणि त्यांच्या सेनेने
केलेली दुष्कृत्ये आंबेडकरी
समाजातील लहान मुल पण समर्थन करणार
नाही पण आपले माजी panthar रामदास
आठवले ,बाळ ठाकरेंना जावून मिळाले , ते सर्व विसरू
शकतील पण जातीयवादी बाळ
ठाकरे आणि शिवसेनेला हा आंबेडकरी समाज माफ
नाही करू शकणार . रामदास आठवले एव्हड्यावर च
नाही थांबले तर बाळ ठाकरे च्या निधनानंतर
अंतयात्रेमध्ये बाळ ठाकरेच्या शवासोबत ट्रक मध्ये चढलेले दिसले
राज ठाकरे एकीकडे पायी चालताना दिसले तर
आठवले साहेब ट्रकवर चढून आंबेडकरी वारसदार कि
ठाकरे वारसदार हे आम्हा आंबेडकरी जनतेला कळाले
नाही ,नामदेव ढसाळ तर आम्ही अगोदरच
बाळ ठाकरेच्या चरणी नतमस्तक होताना पाहिलेले
आहेत . या अंतविधीला आठवले सोबत , बाळ ठाकरेंना
आव्हान देणारे आणि शिव्या देणारे झुंजार नेते जोगेंद्र कवाडे सर सह
,रा . सु . गवई चे चिरंजीव राजेंद्र गवई , महातेकर ,
अर्जुन डांगळे सह अनेक चळवळीला विसरलेले नेते
दिसले . पण तिथे एक व्यक्ती missing होते ते
म्हणजे प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर .
कोणी म्हणेल कि दुश्मनाच्या अंतविधीला
उपस्थित रहाव लागत पण आमच्या बापाच्याही बाप
असलेले बाबासाहेब आणि आंबेडकरी जनतेवर जुलूम
आणि हत्या करणाऱ्या बाळ ठाकरे आणि सेनेचा आदर आणि नावाला
आंबेडकरी असलेल्या खोट्या शेजाऱ्याला असेल परंतु
सख्ख्या बापाच्या रक्ताच्या पोराला बापाच्या अपमानाबद्दल बाळ ठाकरे
सारख्या व्यक्ती बद्दल कधीच आदर असू
शकत नाही हे बाळासाहेब आंबेडकरांनी
अनुपस्थित राहून स्वाभिमानी भीमबाण्याने
दाखवून दिले .
आज बाळासाहेब देशभर फिरून चळवळी ला
नवीन उभारी देत आहेत .भले भले नेते
आर एस एस सारख्या विषमतावादी संघटने समोर झुकत
आहेत तिथे देशात एकमेव बाळासाहेब आंबेडकर आर एस एस ला
खुले आव्हान देत आहेत . रोहित वेमुला च्या आत्महत्येनंतर या
प्रकरणा ला देशभर पेटविण्यासाठी हैदराबाद ,मुंबई
दिल्ली पर्यंत जनतेच्या सोबत बाळासाहेबांनी
रान उठवील अजूनही त्याची
लढाई सुरु आहे . रोहित वेमुला चे कुटुंबीय या
जातीय अन्यायाला कांटाळून बौद्ध धम्म अनुसरतो याचे
श्रेय हे बाळासाहेब आंबेडकर यांना द्यावे लागेल .
कोर्टामध्येही रोहित वेमुलासाठी बाळासाहेब
स्वतः यात उभे आहेत . देशातील असहिष्णूता,शेतक
री आत्महत्या , अन्याय अत्याचार , देशाची
सुरक्षा ,आरक्षण वाचविणे अशा अनेक प्रश्नावर बाळासाहेबांचा लढा
सुरु आहे . या देशात जात गेल्याशिवाय समानता प्रस्थापित होणार
नाही असे बाबासाहेबांनी म्हटलं होत
त्याच सांगितलेल्या मार्गावर बाळासाहेबांचा वैचारिक तितकाच
कृतीशील लढा सुरु आहे .
लोक बाबासाहेबांच्या नावाने सत्ता संपत्ती जमा करतात ,
अहिशोबी मालमत्ता मिळवितात सत्ता उपभोगुन
मुख्यमंत्री काय देशाचे प्रधानमंत्री पण
बनतात तिथे आंबेडकर कुटुंब रक्ताचा वारसा म्हणून नुसत्या नावावर
करोडो अब्जो ची संपत्ती मिळवू शकले
असते इतकच काय कॉंग्रेस भाजप पक्षात जाऊन या देशाचा पंतप्रधान
देखील होता आल असत परंतु बाळासाहेब
बाबासाहेबांच्या रक्ताचा नाही तर विचारांचा वारसा जपतात
बाबासाहेबांनी दिलेला स्वाभिमान जपतात पण आपण एक
आंबेडकरी जनता म्हणून असा स्वाभिमान पाळतो का ?
आज बाळासाहेबांना ३५ वर्षे राजकीय ,सामाजिक
जीवनात झाली राजकीय दृष्ट्या
अल्प यश असेल पण आंबेडकरवाद म्हणजे राजकीय
सत्ता हा होत नाही तर बाबासाहेबांनी
सांगितलेले सामाजिक परिवर्तन त्याची उद्धिष्ट या
बाबतीत बाळासाहेबांचा लढा यशस्वीच
म्हणावा लागेल . आज त्यांच्या ६३ व्या वाढदिवसाला जनतेने त्यांच्या
पाठीशी पूर्ण ताकदनिशी उभे
राहून आपली प्रामाणिकता
चळवळीशी बाळगावी हि
अपेक्षा आणि आता काळाची गरज आहे .