Tuesday, 10 January 2017

संयम बाळगा

😕माझ्यासोबतच असं का होतं?🤔
.

आपण जिवापाड मेहनत करूनही आपल्याला एखादी गोष्ट मिळत नाही आणि त्याचवेळी एखाद्याला थोड्याशा मेहनतीत जर ती गोष्ट मिळाली की, मग तर आपली गाडी एवढी बिघडते की, विचारूच नका...’यार मेरे साथही ऐसा क्युँ होता है?’, ’माझं काय चुकलं राव’, ’नेहमी माझ्यासोबतच असं का होतं?’
.
अशा निरनिराळ्या प्रश्‍नांच काहूर आपल्या मनात सुरू होतं. आपण एवढं हर्ट होतो की, सगळं संपलंय असं वाटायला लागतं... तसं पाहायला गेलं तर अशावेळी विविध प्रश्‍न उपस्थित होणे हे साहजिक आहे. पण यामुळे आपणं डिस्टर्ब होणं कितपत चांगलंय…
.
कदाचित जे आपल्याला मिळालं नाही ते आपल्यासाठी योग्य नसेल, आपल्याला अजून चांगल मिळणार असेल किंवा आपले प्रयत्न थोडे कमी पडले असतील... हा विचार आपल्या मनात येतच नाही... जे मिळालं नाही त्याचं एवढं चिंतन केलं जातं की बस्स! एवढा खचतो माणूस की, त्याला जगणं नको-नको होतं...
.
मित्रांनो, एक लक्षात घ्या आपल्याला एखादी गोष्ट मिळाली नाही, म्हणजे सगळं संपतो का हो? निश्‍चितच नाही. उलट आपण स्वतःला सिद्ध करण्यासाठी अजून थोडं झगडलं पाहिजे, स्वतःवर, स्वतःच्या प्रयत्नांवर विश्‍वास ठेवला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं संयम ठेवला पाहिजे. आयुष्यातला बहुतेक प्रश्‍नांच उत्तर हे ’वेळ’ असतं. त्याच्यामुळे आपल्याकडं कमालीचा संयम असला पाहिजे.
.
मला जे मिळालं नाही तर मला काय-काय मिळालंय... याचं चिंतन केले पाहिजे. म्हणजे आपल्यात सकारात्मकता येईल व आपल्याला हवंय ते मिळण्यासाठी ऊर्जा, उत्साह मिळेल...!

No comments:

Post a Comment