कृपया हि पोस्ट नक्की वाचा आणि आपल्या मुलाना school मधे भाषण करन्यास मदत करा
प्रजासत्ताक भारत आणि डाॅ. बाबासाहेब आंबेडकर ****
सर्वप्रथम आपणा सर्वांस मनःपुर्वक जयभीम नमो बुद्धाय जय संविधान जय भारत....!
आदरणीय बंधु/भगिनींनो आणि मिञमैञीणींनो,उद्या 26 जानेवारी म्हणजे "भारतीय प्रजासत्ताक दिन". या प्रजासत्ताक दिनाबद्दल काही लोकांना अपवाद वगळता बहुतेक लोकांना "प्रजासत्ताक" म्हणजे नेमकं काय हे समजत नसल्याचे मला जाणवत गेले.काहींना विचारले तर म्हणतात की,प्रजासत्ताकदीनी भारतीय राज्यघटना प्रत्यक्ष अंमलात आणली गेली. पण पुढे ती घटना लीहुन अंमलात आणायला लावणारे महामानव कोण याचा विचार माञ लोक करताना दिसत नाहीत.बंधुंनो प्रजासत्ताक बद्दल बोलायला गेले तर सर्व भारतीयांमध्ये विश्वरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान सर्वश्रेष्ठच आहे.कारण आपण प्रजासत्ताक दिन साजरा करतो मग प्रजासत्ताक कोणा मुळे ? संविधानामुळेच ना & संविधान कोणा मुळे ? डॉ.बाबासाहेब आंबेडकरांमुळेच.
26 जानेवारी हा भारताचा प्रजासत्ताक दिन आहे.तो राष्ट्रीय सन आहे.त्याबाबत प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे.म्हणूनच भारतातील प्रत्येक वाडी-वस्ती, गाव, विभाग, मोहल्ला,तालुका,जिल्हा, शहर,राज्य, आणि राष्ट्रात सर्वत्र प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला वंदन केले जाते. 26 जानेवारी 1950 रोजी भारत देश प्रजासत्ताक झाला. म्हणजे नेमके काय झाले? याबद्दल अनेक लोकांना ज्ञातही नसते. त्यामुळे अशा लोकांनी समजुन घ्यायला हवे की, त्या दिवसापासून विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या व देशाला अर्पण केलेल्या & जगातील सर्वश्रेष्ठ लोकशाही गणराज्य मिळवुन देणार्या संविधानानुसार देशाचा राज्याकारभार सुरु झाला. म्हणजे संविधानाची अमलबजावणी 26'जानेवारीपासून सुरु झाली. त्यालाच प्रजासत्ताकदिन म्हणतात.
मग बांधवांनो हा दिन कोणामुळे सुरु झाला?भारतीय संविधानामुळे. भारतीय संविधान कोणामुळे निर्माण झाले? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळे. मग,ज्यांनी संविधान लिहिले त्यांचे स्मरण प्रजासत्ताकदिनी या देशाला झालेच पाहिजे. त्यांना संपूर्ण देशाने वंदन आणि अभिवादन केलेच पाहिजे. परंतु तसे होताना दिसत नाही. प्रजासत्ताकदिनी जो संविधानाला मान, तोच मान संविधान निर्मात्याला, जन्मदात्याला,घटनेच्या शिल्पकाराल दिलाच पाहिजे. म्हणून भारतातील प्रत्येक नागरिकांनी, प्रत्येक राजकीय पक्षांनी व नेत्यांनी, प्रत्येक संस्था-संघटनांनी,शाळा-कॉलेजानी आणी मंडळांनी संविधानाच्या शिल्पकाराला,डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना आदरानेआणि अभिमानाने अभिवादन केलेच पाहिजे. जेथे जेथे राष्ट्राध्वजारोहण करून प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो तेथे तेथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमांचे पूजन पूजनकरून प्रजासत्ताकदिन साजरा करण्यात यावा. आज पर्यंत तसे कोणी केले नसेल (आजकाल जागृतीमुळे ठीकठीकाणी केले जाते) . आतापासून आपण करूया.ज्यांनी केले व जे करीत आहेत,त्यांचा कित्ता आपण गौरवूया.
बांधवांनो, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमांचे पूजन करूनच प्रजासत्ताकदिन साजरा करा,काही ठिकाणी अशी प्रथा सुरु झाली आहे आता आपण सुरु करूया,शासन सुरु करील याची वाट पाहत बसू नये.डॉ. बाबासाहेबांबद्दल शासनाला नेहमीच उशिराच जाग येते. म्हणून आपण जागे राहूया आणि शासनाला जागे करूया.आपण केले कि तो शासनाला निर्णय घ्यावाच लागतो. इंदू मिलचे आंदोलन आपणच केले ना? मग शासनाला जाग आली आणि आत्ताच काही महीन्यापुर्वी इंदुमिलचे भुमीपुजनही झाले.
बांधवांनो, 2 वर्षे, 11 महीने, 17 दिवस & 2:30 तास इतक्या कालावधीत 26 नोव्हेंबर 1949 रोजी विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी या भारताचे संविधान लिहून पूर्ण केले व देशाला अर्पण केले.ज्या दिवशी संविधान देशाला अर्पण करण्यात आलेतो 26 नोव्हेंबर हा दिवस 'संविधान दिन'आणि ज्या दिवसापसुन संविधांची अंमलबजावणी सुरु झाली तो 26 जानेवारी हा 'प्रजासत्ताक दिन '. 2008 पासून महाराष्ट्र शासनाने जी.आर. काढून 26 नोव्हेंबर हा दिवस 'संविधान दिन' म्हणून साजरा करण्यात सुरुवात केली. तेव्हापासून संपूर्ण राज्यात 26 नोव्हेंबर रोजी शासकीय स्तरावर संविधान दिन साजरा करण्यात येतो. आता शासनाने डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करून प्रजासत्ताक दिन साजरा करावा. असा जी.आर. काढावा. शासन करील तेव्हा करील. आपण मात्र आता पासून सुरुवात करू.मी तर केलीच आहे सुरुवात. मागील तीन वर्षांपुर्वी मी आमच्या गावात (महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांचे गाव, सायगांव ता.चाळीसगांव जि.जळगाव) येथे मी असे वक्तव्य केले होते आणि त्याच दिवसापासूनच आमच्या गावात तीनही ठिकाणी ध्वजारोहण करताना प्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन केले जाते.म्हणून मिञांनो डॉ.बाबासाहेब किती मोठे आहेत ते या देशाला पटवून देवूया. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मोठेपण यादेशातील जातीयवाद्यांना खुपते आहे. म्हणून तर ते नेहमी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अनुल्लेख खटाळतात.आंबेडकरांचा खरा इतिहास सांगणार्या लोकांना मरण्यास भाग पाडतात ( हैद्राबाद - रोहीतदादा) आणि अनेक गोष्टींचा खोटा इतिहास सांगतात.डॉ. बाबासाहेबांबद्दल त्यांना खरा इतिहास सांगता येईना. कारण डॉ. बाबासाहेबांनी खरा इतिहास लिहून ठेवला व नवीन इतिहास रचला.त्याचे जतन करण्यासाठी जनता जागृत आहे.म्हणून तर ते डॉ. बाबासाहेबांचा अनुल्लेख टाळतात किंवा ज्या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मोठेपण, महत्व आणि कर्तत्व सिद्ध करण्याचा दिन आहे, त्यiच दिवशी हे जातीयवादी कपट कारस्थानाणे नवीन सन किंवा नवीन सत्यनारायणासारख्या भाडककथा व धार्मिक प्रथा सुरु करतात. हेतू हाच कि त्या दिवशी डॉ. बाबासाहेबांच्या मोठेपनाकडे किंवा कर्तुत्वाकडे लोकांचे लक्ष जावू नये किंवा लोकांना कळू नये.उदाहरण द्यायचे झाले तर 26 जानेवारीचे देवूया.गेल्या 10 ते 12 वर्षापासून 26 जानेवारी रोजी म्हणजेच प्रजासत्ताकदिनी सत्यानारायनाच्या पूजा घालण्यात येवू लागल्या आहेत. या पूजांचे एवढे अवडंबर माजले आहे कि, प्रत्येक गल्लीत हि पूजा होवू लागली आहे.यापूर्वी 26 जानेवारी रोजी का सत्यनारायणाची पूजा घातली जात नव्हती आणि आताच ती का घालण्यात येते ? याचे कारण हेच की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे महत्व मनुवाद्यांना वाढू द्यायचे नाही किंवा कमी करायचे आहे.सत्यनारायणाच्या पूजेचा आदेश दिला कोणी ? व आला कुठून ? तर तो थेट नागपूरच्या हेडक्वार्टरहून आला. कुणाला कळाले नाही, कुठेही गाजावाजा नाही. पण अंमलबजावणी मात्र सर्वत्र होत आहे.
बांधवांनो, प्रजासत्ताक दिनी सत्यनारायण पूजेचे महत्व वाढत आहे, मनुवादी वाढवीतही आहेत. म्हणून आपल्यासारख्या भारतातील आंबेडकरवादी अनुयायांचीही जबाबदारी वाढत आहे. आपण डॉ. बाबासाहेबांचे महत्व गर्जत सांगतोच आणि गाजत सांगितलेही पाहिजे.प्रजासत्ताक दिनी डॉ.बाबासाहेबांच्या प्रतिमांचे पूजन करून प्रजासत्ताकदिन साजरा केला पाहिजे. राष्ट्रध्वज हातात घेवून डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमांच्या मिरवणुका काढल्या पाहिजेत.जातीयवाद्यांना डॉ.बाबासाहेबांचा खोटा इतिहास सांगता येत नाही.म्हणून ते डॉ. बाबासाहेबांचे महत्व कमी करू लागले आहेत. डॉ. बाबासाहेबांनी संविधान लिहिलेच नाही असे त्यांना सांगता येत नाही. म्हणून ते आता संगु लागले आहेत कि, भारताचे संविधान हे काही डॉ. बाबासाहेब आम्बेडकरांनी एकट्याने लिहिले नाही. सात जणांच्य घटना समितीने लिहिले आहे. तेंव्हा आंबेडकरवाद्यांनी त्याचवेळी,तिथल्या तिथेच एका क्षणाचाही विलंब न लावता ठणकावून ठाम पने सांगितले पाहिजे की, "होय मनुवाद्यांनो ! डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी एकट्यानेच भारतीय संविधान लिहिले आहे. तेच संविधानाचे शिल्पकार आहेत". याचे सविस्तर विवेचन करता....
1) डॉ. बाबासाहेब आंबेडकर,
2) एन.गोपालस्वामी अय्यंगार,
3) डी. पी. खेतान,
4) कृष्णास्वामी अय्यर,
5) बी. एल. मित्तल,
6) के. एम.मुन्शी &
7) सय्यद अहमद अब्दुल्ला
......हेच सात विद्वान घटना मसुदा समितीचे सदस्य होते. घटना मसुदा समिती व घटना समिती या वेगवेगळ्या होत्या. डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे घटना मसुदा समितीचे अध्यक्ष होते, तर डॉ. राजेंद्र प्रसाद हे घटना समितीचे अध्यक्ष होते.मूळ घटना समिती 1946 साली (स्वतंत्र्यपूर्व काळात) स्थापन करण्यात आली. त्यात एकूण 379 सदस्य होते तर स्वतंत्र्यानंतर 1947 साली (स्वतंत्र्योत्तर काळात) भारत - पाक फाळणीनंतर स्थापन करण्यात आलेल्या घटना समितीत 299 सदस्य होते. असे असले तरी घटना बनविण्याची अत्यंत महत्वाची पण तितकीच कठीण जबादारी घटना मसुदा समितीवर होती. सात विद्वानांच्या घटना मसुदा समितीतील दोनजण परदेशात गेले. अन्य दोनजण सतत आजारी असल्यामुळे बैठकांना येत नव्हते. एकाचे तर निधन झाले व एकजण स्वत:च्या कार्यात व्यस्त होता आणि उरले ते फक्त विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर. त्यांनीच एकट्याने रात्रंदिवस राबून स्वत:च्या आजाराची पर्वा न करता भारताचे संविधान लिहिले. त्यामुळे डॉ.बाबासाहेब आंबेडकर हेच संविधानाचे एकमेव शिल्पकार आहेत. म्हणून आपण कुठेही आणि केव्हाही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख करताना, 'भारतीय संविधानाचे एकमेव शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर ', असाच उल्लेख केला पाहिजे मी करतोही आणि गावातील काही सन्यातनवाद्यांना खुपतेही पण ते करणार तरी काय ? शेवटी सत्य ते सत्यच..! डि.लिट. कोणीही मिळवू शकतो किंवा भारतरत्न किताब कोणालाही मिळू शकतो. मात्र संविधानाचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकरच होते,आहेत व राहतीलही...! अन्य कोणालाही होता येणार नाही हे माञ निश्चितच...!
जयभीम जय संविधान..!
No comments:
Post a Comment