Saturday, 21 January 2017

पंचशिल

पंचशीलाबाबत एक गोष्ट अशी आहे की,
एकदा एक भिक्खु एका गांवावरुन दुसर्या गावाला जात असतांना रात्र होते.
म्हणून ते त्या गांवच्या शेवटच्या घरातील गृहस्थाला निवा-याची व्यवस्था करायाला विनंती करतात.
तेव्हा तो गृहस्थ आनंदीत होऊन भिक्खुंची राहण्याची व्यवस्था करतात.

सकाळी उठून भिक्खु त्या गृहस्थाला पंचशीलाचे पालन केल्यामूळे तुझे कल्याण होईल असे सांगतात.
परंतू त्या गृहस्थाचा व्यवसाय चोरी करण्याचा असल्यामूळे तो मनातल्या मनात विचार करतो की, हे शील पाळणे मला शक्य होणार नाही.
म्हणून जस-जसे भिक्खु एक-एक शील समजावून सांगतात तस-तसे तो गृहस्थ शीलाचे पालन करण्यास नकार देतो.
त्या गृहस्थाचा व्यवसाय चोरी करण्याचा आहे हे सुध्दा तो गृहस्थ भिक्खूला सांगू शकत नाही.

म्हणून भिक्खु म्हणतात की, पांचही शीले पाळता येत नसतील तर निदान चार शीले तरी पाळा.
तो गृहस्थ त्यालाही नकार देतो.
तेव्हा भिक्खु म्हणतात की, निदान तीन शीले तरी पाळा.
तो गृहस्थ त्यालाही नकार देतो. तेव्हा भिक्खु म्हणतात की,
निदान दोन शीले तरी पाळा.
तो गृहस्थ त्यालाही नकार देतो. तेव्हा भिक्खु म्हणतात की,
निदान एक शील तरी पाळा.

गृहस्थाला वाटते की, एखादा शील तरी पाळायला काय हरकत आहे, म्हणून तो गृहस्थ भिक्खूला म्हणतो, “मी खोटे बोलणार नाही, हे शील पाळायला तयार आहे.”

भिक्खु उपदेश करुन निघून जातात.
रात्रीला नेहमीप्रमाणे तो गृहस्थ चोरी करायला बाहेर पडतो. त्याचवेळेस त्या राज्याचा राजा सुध्दा वेशांतर करुन राजवाडयाच्या बाहेर येतो.
तेव्हा त्या राजाला तो गृहस्थ दिसतो.
त्या गृहस्थाला राजा विचारतो, “कोण आहेस ?
काय करतो ?”
त्या गृहस्थाने खरे बोलण्याची प्रतिज्ञा घेतल्यामूळे त्याने सांगितले,
“मी चोर आहे. राजाच्या तिजोरितील हिरे मला चोरायचे आहे.”
तेव्हा त्या राजाला त्याच्या खरे बोलण्याबद्दल कौतूक वाटले.
राजाने त्याला सांगितले,
“ तू तर खरा बोललास. मी जर हे राजाला सांगितले तर ते तुला शिक्षा करतील. म्हणून तू जे हिरे चोरशील त्यापैकी मला अर्धे दे. म्हणजे मी राजाला सांगणार नाही.”
या गोष्टीला तो चोर तयार झाला.

तो राजवाडयाच्या आंत जाऊन हिर्याचा शोध घेतो. तेव्हा त्याला असे दिसले की,
त्या तिजोरीत फक्त तिनच हिरे आहेत.
यापैकी अर्धे हिरे बाहेरच्या व्यक्तीला कसे देणार असा प्रश्न पडल्यामूळे तो एक हिरा तसाच ठेऊन दोन हिरे सोबत घेऊन राजवाडयाबाहेर पडतो.
बाहेरच्या व्यक्तीला त्या दोन पैकी एक हिरा देतो.त्या व्यक्तीने विचारल्यामूळे पत्ता सांगून तो चोर निघून जातो.

दुसर्या दिवशी राजा प्रधानाला तिजोरीची पाहणी करायला सांगतात.
तिजोरी पाहील्यानंतर प्रधानाला तिन पैकी फक्त दोन हिरे चोरीला गेल्याचे आढळते.
प्रधानाला वाटते की, चोराने तिन्हिही हिरे चोरले असते. राजाला कुठे माहिती आहे की,
एक हिरा चोराने तेथेच ठेऊन दोन हिरे घेऊन गेला.

म्हणून तो एक हिरा स्वत:जवळ ठेवतो व राजाला सांगतो की, तिजोरितील तिन्हिही हिरे चोरीला गेले आहेत.

राजाला त्या प्रधानाचा खोटेपणा व चोराचा खरेपणा लक्षात आला.

त्याचवेळेस राजा दरबार भरवतो. हिरे चोरणार्या त्या चोराला राजा दरबारात बोलावीतो.
चोराच्या लक्षात येते की, रात्रीचा जो व्यक्ती होता तो राजा आहे. आपण त्याला खरे सांगितल्यामूळे राजा आता आपल्याला निश्चितच शिक्षा करणार...

आपण भिक्खुमूळे फसल्या गेलो याचे त्याला दु:ख झाले.
राजाने प्रधानाने केलेल्या खोटेपणा बद्दल प्रधानाला काढून टाकले व चोराच्या ख-यापणाबद्दल त्या चोराला प्रधान बनवीले.

राजाचा हा निर्णय पाहून चोराला आश्चर्य वाटले.
भिक्खूने सांगितलेल्या एका शीलाचे पालन केल्यामूळे मला प्रधानपद मिळते.
मी जर पांचही शीलाचे पालन केले असते तर मी कुठल्या कुठे जाऊन पोहचलो असतो.
एवढी ताकद या पंचशीला मध्ये आहे याची त्याला जाणीव झाली.....!!!
नमो बुद्धाय ।
— 👏👏👏👏👏🙏🙏

No comments:

Post a Comment